मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटिल
ज्या ज्या वेळी महाराष्ट्राच्या मातीवर संकटे आली त्या त्या वेळी या मायभुमीने ती संकटे दुर करण्यासाठी योध्दा पुत्र जन्माला घातले त्यातीलच एक आमचे प्रेरणास्थान मराठा अस्मितेचा बुलंद आवाज मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील . अण्णासाहेब _ जावळे _ पाटील यांचा जन्म १६ एप्रिल १९७८ ला धाराशिव जिल्यातील मेंढा ( घुगी ) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला . हालाकीची परिस्थिती असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण औसा तालुक्यातील तुंगी येथे आश्रम शाळेत झाले . त्यांच्या लहानपणीच देवाने त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हि रावून घेतले . अशा परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी मागे वळून न पाहता पदवीपर्यंतचे शिक्षण दयानंद महाविद्यालय ( लातूर ) येथे घेतले . नंतर ते लातूर येथेच स्थायिक झाले . पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अण्णासाहेब विद्यार्थीदशे पासूनच आक्रमक होते . अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती असल