अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नेता
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा नेता, लढाऊ आणि बाणेदार वक्तव्यांनी प्रस्थापित राजकारण्यांना हादरे देणारा, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नेता म्हणूनच अण्णासाहेब जावळे-पाटील यांची महार ाष्ट्राला ओळख राहिली. अण्णासाहेब जावळे-पाटील यांचे मूळ गाव मेंढा (जि. उस्मानाबाद) होते. त्यांचे वडील सिद्राम जावळे-पाटील हे सुरवातीला तुंगी (ता. औसा) आणि तेथून लातूरला स्थायिक झाले. वडील शेतकरी कुटुंबातील होते. त्यांनी काही वर्षे शेतकरी संघटनेचे कार्य केले होते. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले अण्णासाहेब जावळे विद्यार्थीदशेपासूनच आक्रमक होते. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती असल्याने समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून ते विविध समस्यांविरुद्ध चळवळी करू लागले. त्यांनी मराठा समाजाच्या युवकांना एकत्र करून अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन स्थापन केले. उत्कृष्ट भाषणशैली, निर्णयक्षमता आणि मागचा-पुढचा विचार न करता लढा देण्याची धमक पाहून मराठवाडा आणि महराष्ट्रभर त्यांचा लौकिक वाढला. समाजाचा प्रश्न तळमळीने मांडत गेल्याने ते फार कमी कालावधीत राज्यभरातील युवकांचे नेते बनले. त